शिंगणापूर नाका ते लक्षतीर्थ रस्ता बंद
कोल्हापूर/ प्रतिनिधी
धरण क्षेत्रासह जिल्ह्यात गेल्या 24 तासात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडले आहेत. कोल्हापूर शहरातही अतिवृष्टी सुरू आहे. यामुळे पंचगंगा नदी पाचव्यांदा पात्र बाहेर पडले आहे.
गेल्या दोन दिवसापासून सुरू असणाऱ्या जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे बहुतांशी धरणे भरले आहेत विशेषता राधानगरी धरण 100 टक्के भरले असून साथी दरवाजे उघडे आहेत यामुळे पंचगंगा नदीची पातळी वाढली आहे. सोमवारी सायंकाळ नंतर पंचगंगा नदी पाचव्यांदा पात्रावर पडली.
….
शिंगणापूर रस्ता पुन्हा बंद
शिंगणापूर नाका ते लक्षतीर्थ वसाहत रोड या रस्त्यावर रात्री 9 च्या सुमारास पुराचे पाणी आले आहे. यामुळे हा रोड महापालिकेने बॅरिगेट लावुन बंद केला आहे.